बंद करा

हरिश्चंद्रगड

श्रेणी ऐतिहासिक, धार्मिक

खिरेश्वरपासून ८ किमी अंतरावर, भंडारदरापासून ५० किमी अंतरावर, पुण्यापासून १६६ किमी आणि मुंबईपासून २१८ कि.मी. अंतरावर, हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक  किल्ला आहे. किल्ल्याची उंची १४२४  मीटर आहे. हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारादरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे.

कलचुरी राजवंशाच्या राजवटीतील हा किल्ला ६ व्या शतकातील आहे. कदाचित ११  व्या शतकातील विविध लेणी कोरण्यात आल्या. संत चांगदेव १४  व्या शतकात येथे ध्यान करण्यासाठी वापरले. नंतर किल्लावर   मुगलांचे नियंत्रण होते आणि मराठ्यांनी ई.स. १७४७  मध्ये ताब्यात घेतले. येथे मायक्रोलायथिक रहिवाशांचे अवशेष सापडले आहेत. मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण यासारख्या अनेक पुराणात हरिश्चंद्रगडाचे अनेक संदर्भ आहेत.

रोहिदास, तारामती आणि हरिश्चंद्र हे हरिश्चंद्रगडमधील तीन शिखरे आहेत.

छायाचित्र दालन

  • हरिश्चंद्रगड कुंड
  • हरिश्चंद्रगड वरून घेतलेले दृश्य
  • हरिश्चंद्रगड लांबून

कसे पोहोचाल:

हवाई मार्गाने

जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.

रेल्वेमार्गाने

जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.